Monday, March 24, 2008

अहिराणी हिरा.

आतापर्यंत मी ऐकलेल्या, वाचलेल्या आणि पाहीलेल्या (नव साहित्यिकांनी केलेले) अहीराणी साहित्यात मला फ़ार रस वाटत नव्हता. मी तसे फ़ारसे नविन साहित्य वाचलेलं नाही किंवा वेळ मिळाला नाही ही दोघेही कारणं १०० % खरी आहेत. पण २००७ च्या दिवाळीत मला अहिराणी भाषेतली जादू कळली. मी दिवाळीत पिंगळवाड्याला (अमळनेर जि. जळगाव.) गेलो होतो. तिथे मी जत्रा , तमाशा ह्या गोष्टी फ़ार जवळून पाहील्या, तसा जत्रेशी माझा परीचय लहानपणापासुनच आहे. पण काही गोष्टी मला तेव्हा वर्ज्य होत्या त्या म्हणजे तमाशा इ. पिंगळवाडे गाव तसे लहान पण दिवाळीत तेच गाव पाच पटीनी वाढलेलं वाटायचे, याचं कारण म्हणजे भवानी देवीची जत्रा. या छोट्याश्या गावात पाच तमाशे लागतात आणि रात्रभर गाव जागवतात. दु्सरया दिवशी माझे चर्चासत्र रंगले ते श्री. प्रकाश पाटील यांच्या सोबत.
परीचय : श्री. प्रकाश पाटील.
प्रकाश पाटील यांचा जन्म अमळनेर तालुक्यात खेडी या गावी झाला. वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. त्याचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. आजीने त्याना १०वी पर्यत शिक्षण घेवू दिले. त्यानंतर मात्र आजीने शेतीकडे लक्ष द्यायला सांगीतले. पुढे मात्र आजी स्वर्गवासी झाल्यावर प्रकाश यांनी पुन्हा एकदा शिक्षणाकडे धाव घेतली. त्यानी एरंडोल कोलेज मधुन BA पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच त्यांचा कल कलेकडेही होता या काळात त्यांनी बऱ्याचशा नाटकात भाग घेतला. पुढे नाटकातली आवड जोपासत त्यांनी कविता व कथा लिहीण्यास सुरुवात केली. आज ते एक कुशल शेतकरी तर आहेतच त्याबरोबर ते अहिराणी कथा लेखक आणि कवी देखील आहेत.
यापुढील पोस्टस मधे मी त्यांच्या काही कविता आणि अहिराणी चित्रपटातील काही गाणी त्यांच्या अनुमतीने लिहिणार आहे.

विषेश सुचना : या सर्व कविता आणि गाण्यांचे प्रकाशनाचे (कुठल्याही स्वरुपात)मालकी हक्क श्री प्रकाश पाटील. यानी राखुन ठेवलेले आहेत.
त्यांच्या खालील कवीतेची चाल "मिलती है जिन्दगीमे मोहब्बत कभी कभी ..." या हिंदी गाण्यावर आधारीत आहे.

थिजना डॊय़ा वाट देखामा, पपनी तानी तानी-
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु जाय कानी कानी-
वैशाखवणवा मनी हयाती, तु चिचनी छाय़ा
तुनी सावली झाम्लामा, जमाना ग्या पुरा वाया
जिभ पडी गई कोल्ली ,जिव करस पानी पानी ....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु जाय कानी कानी-!!!!...........................
आखाड्ना आन्धारानी इन्ज, तु जशी दाये माले रस्ता-
दगना बापन काय गये , तो गर्जे काभ नुस्ता
फोडात त्येनी कान मना, पर्दावर हानी हानी.....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु जाय कानी कानी-!!!!............................
थोडी काडीले तु वाट वाकडी , मन तुन नीट-
हाई नीट रस्तानी ,वाकडी दुनियाना उना जीवले ईट
धगधगात इस्तू सान्गे, डोयामा आसु आनी आनी ....
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु जाय कानी कानी-!!!!.............................
लाह्या जश्या तुन्या आटवणी, उडतीस तड्तड-
तुनी यादमा जिव चितावर करी भड्भड
जिभा झडू दे शाहिरन्या तुले वानी वानी...
खान्दावर मनी जत्रा चालनी, तु जाय कानी कानी-!!!!............................

-------------------------------X ---------------------------

आपल्या शुभेछ्चा सुचना स्वागतार्ह.

5 comments:

नितिज..... said...

bhalat base she bho...
jiv kasa sukhi vi gya vachisan...
navin post kar na bahu?

yadu said...

mast she bhau. tumanya hya kavita me orkut ni ahirani laguage ma taki rayan soujanya matra tumalech rahin.

sadashiv said...

KANBAINA AANI AAKHAJINA GANA B DUNIYAMA HIT KARJYAT BRKA.

Sandeep Patil said...

liMast kavita karas bho!

Sandeep Patil said...

Amhle nhi jamas bho hau chanda! tu karat jay par gadya!